Friday, 6 June 2014

पोलीस दलातील ‘‘ विश्वास ‘‘
=   =  =   =   =   =   =  =  =

जे अशक्य वाटतय
ते स्वप्न मला पहायचंय...!
ज्या शत्रुचा कोणी पराभव करु शकत नाही
त्याला मला हरवायचयं..!
कोणालाही सहन होत नाही असं दु:ख मला सहन करायचयं...!
ज्या ठिकाणी धाडसी माणूस जाण्यास साहस करत नाही
त्या ठिकाणी मला जाऊन धावायचयं...!
ज्या वेळी माझे बाहू थकलेत
पाय थकलेत, हात थकलेत,
शरीर थकलय, त्या वेळेस मला,
समोर ‘ एव्हरेस्ट ‘ दिसतोय
त्या वेळी मला माझे
एक एक पाऊल त्या ‘ एव्हरेस्ट ‘ च्या दिशेने टाकायचंय...!
तो ‘ स्टार ‘ मला गाठायचायं
मला सत्यासाठी झगडायचंय
त्यासाठी संर्घष करायचाय..
कोणताही प्रश्न त्यासाठी विचारायचा नाही
थांबा घ्यायचा नाही...!
माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे पण
त्याला कारण ‘ स्वर्गीय ‘
असलं पाहिजे...!
राज्याच्या पोलीस ख़ात्यातील धडाकेबाज व्यक्तिमत्व म्हणून ओळख़ल्या जाणाºया विश्वास नांगरे पाटील यांचे हे विचार आहेत. ‘आयपीएस‘च्या परीक्षेंतर्गत ‘‘ तुम इस दुनियामे क्यों आये हो?‘‘असा प्रश्न मुलाख़तकर्त्याने विचारला आणि त्याला पाटील यांनी या कवितेच्या माध्यमातून उत्तर दिले. मुलाख़तकाराने मन:पूर्वक दाद दिली नसती तरच नवल. या कवितेचा मोठा प्रभाव नांगरे पाटील यांच्यावर आहे हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसते. कामातून अधोरेखित होेते. मुंबईवरील हल्ल्याप्रसंगी केवळ एक पिस्तुल घेऊन नांगरे-पाटील दहशतवाद्यांशी दोन हात करायला निधड्या छातीने ताज ह्ॉटेलमध्ये घुसले होते. त्यांच्या या कामगिरीची दख़ल घेऊन त्यांना राष्टÑपती शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे.
राज्यात शेकडो पोलीस अधिकारी आहेत. त्यामध्ये मराठी टक्का तुलनेत कमी असला, तरी मराठी अधिकारी चमकदार कामगिरी करताना दिसतात. त्यामध्येच नांगरे पाटील यांचाही समावेश आहे. ग्रामीण-नागरी सर्व ठिकाणी काम करताना नांगरे-पाटील यांनी धडाकेबाज कामगिरी करून अमीट ठसा उमटवला. सध्या मुंबईत अतिरीक्त पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असलेले नांगरे-पाटील मूळचे सांगली जिल्ह्यातील कोकरूड गावचे. मुंबईवर  पाच वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रसंगी निधड्या छातीने ताज हॉटेलात शिरणारे ते पहिले पोलीस अधिकारी होते. बीएच्या परीक्षेत सुवर्णपदक पटकावलेल्या नांगरे पाटील यांची पोलीस दलातील  कारकिर्दशैक्षणिक कारकिर्दीप्रमाणेच झळाळती ठरली. मुंबईवरील हल्ल्यात सर्वात प्रथम पोचून दहशतवाद्यांचा ख़ात्मा होईपर्यंतच्या अ़ख़ेरच्या क्षणापर्यंत ते लढत होते. सीसी टीव्ही कॅमेºयाच्यामाध्यमातून नियंत्रण कक्षाला दहशतवाद्यांच्या ठावठिकाण्याची माहिती वरिष्ठांना देत होते. पोलीस व कमां़डोंना त्यांची मदत मोलाची ठरली.
नांगरे-पाटील यांनी पुणे, नगर, ठाणे येथेही कामाची अमीट मोहोर उमटवली.  पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलात अधीक्षक असताना पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी केलेल्या कारवाईमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी  सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकून शेकडो तरुण-तरुणींना अटक केली होती. त्यांच्या या कामगिरीची देशपातळीवर चर्चा झाली. नगरमधील अवैध धंद्यांना त्यांनी आळा घातला. सगळे बार,पान टपºया रात्री नऊलाच बंद करून कायदा व सुव्यवस्थेची परीस्थिती निर्माण केली. महिलांना सुरक्षिततेची हमी दिली. साध्या वेषात जाऊन अवैध धंदेवाल्यांवर कारवाई करण्याच्या त्यांच्या धडाकेबाज पद्धतीमुळे आणि राजकीय दबाव झुगारण्याच्या वृत्तीमुळे ते तरुणाईच्या गळयातील ताईत बनले. मुंबईत कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ त्यांनी हस्तगत केले. राज्यभरातील कित्येक विद्यार्थी त्यांचे व्याख़्यान ऐकायला उत्सुक असतात. नगर, पुणे,आणि ठाणे येथेही चमकदार कामगिरी करीत त्यांनी त्यांच्यावर असलेल्या कवितेचा प्रभाव दाख़वून दिला आहे. 

No comments:

Post a Comment