Friday, 6 June 2014

च्यायला...कधी काय होईल...कधी कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल....कधी कोण कोणत्या रुपात भेटेल काही सांगता येत नाही,,, मगाचाच एक प्रसंग... मनात घर करून बसला..ताजला प्रेस कॉन्फरन्सला गेलो होतो. तिथं बरेच जुने मित्र भेटले. नेहमीप्रमाचे पीसी संपल्यावर चहा प्यायला बाहेर टपरीवर आलो.गप्पा टप्पा सुरू झाल्या. एक-दोन कॉलेजचे मित्रही भेटले तिथं...गप्पांना रंग चढला ..अन तितक्यात ''तो'' तिथं आला. त्याला कुठंतरी पाह्यल्यासारखं जाणवलं .पण काही केल्या लक्षातच येईना..मग त्याच्या खादीच्या शर्टवरून तर्क बांधला. एक-दोघांना विचारलं.. हा राकेशच आहे का? म्हणून..त्यांनीही अंदाजाने हो म्हणून सांगितलं..एकाने पूर्ण खात्री दिली...मग जाताना त्याचंच लक्ष गेलं आणि पूर्वीच्याच आपलेपणानं तो जवळ आला. ख्याली-कुशल विचारलं..गप्पा टप्पा चालल्या असल्या तरी तो नजर चुकवतोय हे माझ्या लक्षात आलं. आणि ते साहजिकच होतं. कारण पाच वर्षांपूर्वी पूर्ण सावळ्या रंगाचा असलेला राकेश आता कोडाने पूर्ण पांढरा झाला होता...धक्काच बसला त्याला तसे पाहून..नाही म्हणायला काही वर्षांपूर्वी त्याच्या गालावरची त्वचा थोडी भुरकट झाली असल्याचं आठवलं. पण, पाच वर्षांत एवढा बदल?? वैद्यक क्षेत्र एवढं प्रगत झालयं तरी कोडासारख्या त्वचारोगाला काही औषध अजून कसं सापडलं नाही? मग कॅन्सरसारख्या दुर्धर विकारावर कधी औषध सापडणार? कोड झालेल्या व्यक्तीचा आत्मविश्वास हरवतो. त्यांच्यासाठी काही सपोर्ट ग्रुप समाजात सुरू झाले पाहिजेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या मंडळींच्या पुढच्या पिढीची स्थिती अडचणीची होते. हा वांशिक विकार आहे या समजुतीने त्यांच्या मुलामुलींच्या लग्नाचे प्रॉब्लेम होतात. अलिकडच्या काळात आपल्याकडे सर्वच बाबतीत सतर्कता निर्माण झाल्याचे चित्र आहे. या मुलांच्या विवाहासाठी निरनिराळ्या संस्थांनी, समाजघटकांनी पुढं आलं पाहिजे. राकेशने काही खंत व्याक्त केली नव्हती..पण त्याचचीनजर बरंच काही बोलून गेली....

No comments:

Post a Comment