76 टक्के मार्क्स.....
-- - -- -- -- -- -- -- --
दहावीचा निकाल म्हटलं की पूर्वी फार धूम असायची....आम्ही शाळेत होतो तेव्हा पेपरवाल्यांकडं एक दिवस आधी निकाल यायचा....केसरी, तरूणभारत, संध्या, राष्ट्रतेज असे पेपर एक रुपया घेऊन निकाल सांगायचे...त्यासाठी लांबचलांब रांगा लागलेल्या असायच्या.....मी कॉलेजला असतानाच 90 च्या उत्तरार्धात लोकसत्तामध्ये रुजू झालो...तोवर आदल्या दिवशी निकाल सांगायची पद्धत रूढच होती....बोर्डामध्ये निकाल जाहीर करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स असायची...तिथं निकालाचं सगळं पुस्तक मिळायचं....मग ओळखीपाळखीतल्या मुलांचे निकाल आम्ही आधीच पाहून ठेवायचो...आफीसला येईपर्यंत मुलांची, पालकांची बरीच मोठी लाईन लागलेली असायची. लोकसत्ता किंवा सकाळमध्ये निकाल सांगायला पैसे घेत नसत...पण, त्या दिवशी अनेकांचे फोन असायचे...निकाल विचारायला...आफीसची गर्दी वेगळीच...मग आम्ही खास एक माणूसच अपॉईंट करायचो पुस्तकातून निकाल शोधून सांगायला....पण अनेकदा त्याच्या नजरचुकीने अनेक घोटाळे होत...नापास विद्यार्थी पास, पास विद्यार्थी नापास....असं काहीही...आणि त्यातून अनेक बरेवाईट प्रसंग घडायचे...त्यातला साधारणत: 1998-99च्या सुमारास घडलेला एक प्रसंग कायमचा चटका लावून गेला...
दै. सकाळपासून मेहुणपुरा हाकेच्या अंतरावर...मेहुणपुरा म्हणजे अधिकांश पुणेरी ब्राम्हणांचे वास्तव्य असलेला अस्सल पुणेरी भाग...छान जुने वाडे...पुणेरी संस्कृती कधीकाळी इथे पुरेपूर नांदत होती...कालानुरूप इथेही आता वाडे पडून बिल्डींग उभ्या राहील्यात....इथे एका वाड्यात करंदीकरांचं कुटुंब रहायचं....छान.सुखवस्तू परिवार...यांचा कोणाला त्रास नाही...कुणाला यांचा त्रास नाही....करंदीकर मूळचे कोकणातले...तिथं काही नातलग होते त्यांचे...त्यामुळे उन्हाळ्यात त्यांच्या घरात आंब्याची आढी लागलेली असायची...उन्हाळ्यात अनेक नातलग भेटीला येत असत...त्या वर्षी त्यांचा नातू म्हणजे मुलीचा मुलगा रोहन सुटीसाठी मुंबईहून आला होता.....दहावीची परीक्षा दिलेला रोहन मस्त चुणचुणीत मुलगा होता.....लाघवी स्वभावाने आणि चुणचुणित वागण्याने दोन-चार दिवसांतच तो वाड्यात सर्वांच्या परिचयाचा झाला...गोरापान, काहीसा ठेंगणा पण तरतरीत रोहन दिवसभर वाड्यात हुंदडत असायचा...कधी क्रिकेट खेळ...कशी शनिवारवाड्यातच खेळायला जा...कुठे वाड्यातल्या पोरांबरोबर पोहायलाच जा...असा दिवसभर त्याचा कार्यक्रम चालायचा....वाड्यातल्या मुलांमधलाच तो होऊन गेला होता...करंदीकर अप्पाही त्याचे खूप लाड करायचे....
एके दिवशी रोहन काहीसा अस्वस्थ असल्याचं काही मुलांना जाणवलं....काही किरकोळ बाब असेल या समजुतीने त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही...पण, त्या दिवशी संध्याकाळपासून रोहन गायब झाला....सगळ्यांनी शोधलं त्याला.....वाडा सोडला, तर बाहेर त्याचे फारसे मित्र नव्हतेच...तरीही आजुबाजूच्या परिसरात त्याची शोधाशोध केली...पण रोहनचा ठावठिकाणा लागला नाही...करंदीकर आजोबांच्या काळजाचा ठोकाच चुकला...वाड्यातले सगळे रहिवासी, मुले एकत्र जमली... सर्वांनी पुन्हा एकदा सगळीकडे शोधाशोध सुरू केली...पण रोहन सापडला नाही....मग मात्र सारेच घाबरले....अवखळ रोहन मुद्दाम कुणाच्या घरात लपून बसलाय का हे ही सा-यांनी पाहिलं.....पण छे....त्याचा पत्ताच लागेना....वाड्यातल्या सा-या चालू-बंद खोल्या शोधून झाल्या...मग एकाच्या लक्षात आलं की अप्पांची एक खोली बंद आहे...ती नेहमीच्या वापरातली खोली नव्हती.....तिथं अप्पांनी आंब्याची आढी लावली होती....एकाने त्या खोलीचा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला...दार आतून बंद होतं....मग दोघातिघांनी ताकद लावून दरवाजा उघडला....बघतात तो काय!...... दहा बाय दहाच्या त्या खोलीत ट्यूब लाईटचा लख्ख् उजेड पसरला होता....आढी लावलेल्या अस्सल कोकणी आंब्यांचा घमघमाट सुटला होता....अन......खोलीच्या एका कोप-यात आढ्याला गळफास घेतलेला रोहनचा निष्प्राण देह लटकत होता.....
घडल्या प्रकाराने करंदीकर कुटुंबियांच्या शोकाला पारावार उरला नाही....वाड्यात शोककळा पसरली....पोलीस आले...रोहनचा देह तातडीने ससून रुग्णालयात हलवला....पण काहीच उपयोग नव्हता...त्याच्या कुडीतून प्राण केव्हाच निघून गेले होते.....वाड्यात राहूल तळेकर हा माझा शाळकरी मित्र रहायचा....त्याने फोन केला....'सकाळ'मधून मी लगेच तिथं गेलो...ती खोली पाहिली....रोहनचा फोटो पाहिला...काळजात चर्र् झालं....पण, त्यानं असं का केलं?? हा प्रश्न छळत होता सर्वांनाच.....मग हळूच एका मुलाने सांगितलं...दुपारी रोहन दहावीचा निकाल बघायला एका वर्तमानपत्राच्या आफीसमध्ये गेला होता...एक रुपया देऊन त्याने रिझल्ट पाहिला....परीक्षेत तो नापास झाला होता...आता आई-बाबांना, मित्रांना, वाड्यातल्या रहिवाशांना कसं तोंड दाखवायचं? या भावनेनं तो निराश झाला.... त्याला स्वत:ची कमालीची लाज वाटली असावी.....म्हणूनच इवल्याश्या वयात त्याने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला असावा.........मी रोहनचा परीक्षा क्रमांकही टिपून घेतला....आफीसला गेलो.. रोहनच्या आत्महत्येची बातमी देऊन अस्वस्थ मनानं घरी निघालो....त्यावेळी रोहनचा नंबर माझ्याकडं असल्याचं लक्षात आलं....पुन्हा वर आफीसला गेलो....दिवसभर सर्वांनाच 'वॉन्टेड' असलेलं दहावीच्या निकालाचं पुस्तक आता एका कोप-यात एकाकी पडलं होतं....मी रोहनचा क्रमांक त्यात तपासून पाहिला...पुन:पुन्हा पाहिला....डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता....मग एकदोघांना तो नंबर देऊन त्यांना तपासून पहायला सांगितलं...मी बरोबर होतो.....रोहनला चक्क 76 टक्के मार्क्स पडले होते.....ते तर त्याला दुस-या दिवशी शाळेतही समजले असते...पण वर्तमानपत्राच्या आफीसमधून आगावू रिझल्ट पाहताना तेथील कर्मचा-याची काही गफलत झाली अन कोवळ्या रोहनचा हकनाक जीव गेला....पायाखालची जमीनच सरकल्याचा भास झाला...बुलेटला किक मारण्याचंही त्राण उरलं नव्हतं.....तितक्यात मोबाईल वाजला....राहूलचाच फोन होता...रोहनला 76 टक्के मार्क्स पडल्याचं त्याला सांगितलं...बातमी पुन्हा मागवून घेतली....'अनुत्तिर्ण विद्यार्थ्याची आत्महत्या' हा बातमीचा मथळा बदलला.....तपशील बदलला...' निकाल सांगण्याच्या गफलतीतून विद्यार्थ्याचा हकनाक बळी' असा मथळा देऊन मी बातमी बदलली.....इतक्या वर्षांनंतर आताही कुणाला 76 टक्के मार्क्स पडल्याचं समजलं की रोहनचा चेहरा डोळ्यासमोर येतो....
—-- - -- -- -- -- -- -- --
दहावीचा निकाल म्हटलं की पूर्वी फार धूम असायची....आम्ही शाळेत होतो तेव्हा पेपरवाल्यांकडं एक दिवस आधी निकाल यायचा....केसरी, तरूणभारत, संध्या, राष्ट्रतेज असे पेपर एक रुपया घेऊन निकाल सांगायचे...त्यासाठी लांबचलांब रांगा लागलेल्या असायच्या.....मी कॉलेजला असतानाच 90 च्या उत्तरार्धात लोकसत्तामध्ये रुजू झालो...तोवर आदल्या दिवशी निकाल सांगायची पद्धत रूढच होती....बोर्डामध्ये निकाल जाहीर करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स असायची...तिथं निकालाचं सगळं पुस्तक मिळायचं....मग ओळखीपाळखीतल्या मुलांचे निकाल आम्ही आधीच पाहून ठेवायचो...आफीसला येईपर्यंत मुलांची, पालकांची बरीच मोठी लाईन लागलेली असायची. लोकसत्ता किंवा सकाळमध्ये निकाल सांगायला पैसे घेत नसत...पण, त्या दिवशी अनेकांचे फोन असायचे...निकाल विचारायला...आफीसची गर्दी वेगळीच...मग आम्ही खास एक माणूसच अपॉईंट करायचो पुस्तकातून निकाल शोधून सांगायला....पण अनेकदा त्याच्या नजरचुकीने अनेक घोटाळे होत...नापास विद्यार्थी पास, पास विद्यार्थी नापास....असं काहीही...आणि त्यातून अनेक बरेवाईट प्रसंग घडायचे...त्यातला साधारणत: 1998-99च्या सुमारास घडलेला एक प्रसंग कायमचा चटका लावून गेला...
दै. सकाळपासून मेहुणपुरा हाकेच्या अंतरावर...मेहुणपुरा म्हणजे अधिकांश पुणेरी ब्राम्हणांचे वास्तव्य असलेला अस्सल पुणेरी भाग...छान जुने वाडे...पुणेरी संस्कृती कधीकाळी इथे पुरेपूर नांदत होती...कालानुरूप इथेही आता वाडे पडून बिल्डींग उभ्या राहील्यात....इथे एका वाड्यात करंदीकरांचं कुटुंब रहायचं....छान.सुखवस्तू परिवार...यांचा कोणाला त्रास नाही...कुणाला यांचा त्रास नाही....करंदीकर मूळचे कोकणातले...तिथं काही नातलग होते त्यांचे...त्यामुळे उन्हाळ्यात त्यांच्या घरात आंब्याची आढी लागलेली असायची...उन्हाळ्यात अनेक नातलग भेटीला येत असत...त्या वर्षी त्यांचा नातू म्हणजे मुलीचा मुलगा रोहन सुटीसाठी मुंबईहून आला होता.....दहावीची परीक्षा दिलेला रोहन मस्त चुणचुणीत मुलगा होता.....लाघवी स्वभावाने आणि चुणचुणित वागण्याने दोन-चार दिवसांतच तो वाड्यात सर्वांच्या परिचयाचा झाला...गोरापान, काहीसा ठेंगणा पण तरतरीत रोहन दिवसभर वाड्यात हुंदडत असायचा...कधी क्रिकेट खेळ...कशी शनिवारवाड्यातच खेळायला जा...कुठे वाड्यातल्या पोरांबरोबर पोहायलाच जा...असा दिवसभर त्याचा कार्यक्रम चालायचा....वाड्यातल्या मुलांमधलाच तो होऊन गेला होता...करंदीकर अप्पाही त्याचे खूप लाड करायचे....
एके दिवशी रोहन काहीसा अस्वस्थ असल्याचं काही मुलांना जाणवलं....काही किरकोळ बाब असेल या समजुतीने त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही...पण, त्या दिवशी संध्याकाळपासून रोहन गायब झाला....सगळ्यांनी शोधलं त्याला.....वाडा सोडला, तर बाहेर त्याचे फारसे मित्र नव्हतेच...तरीही आजुबाजूच्या परिसरात त्याची शोधाशोध केली...पण रोहनचा ठावठिकाणा लागला नाही...करंदीकर आजोबांच्या काळजाचा ठोकाच चुकला...वाड्यातले सगळे रहिवासी, मुले एकत्र जमली... सर्वांनी पुन्हा एकदा सगळीकडे शोधाशोध सुरू केली...पण रोहन सापडला नाही....मग मात्र सारेच घाबरले....अवखळ रोहन मुद्दाम कुणाच्या घरात लपून बसलाय का हे ही सा-यांनी पाहिलं.....पण छे....त्याचा पत्ताच लागेना....वाड्यातल्या सा-या चालू-बंद खोल्या शोधून झाल्या...मग एकाच्या लक्षात आलं की अप्पांची एक खोली बंद आहे...ती नेहमीच्या वापरातली खोली नव्हती.....तिथं अप्पांनी आंब्याची आढी लावली होती....एकाने त्या खोलीचा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला...दार आतून बंद होतं....मग दोघातिघांनी ताकद लावून दरवाजा उघडला....बघतात तो काय!...... दहा बाय दहाच्या त्या खोलीत ट्यूब लाईटचा लख्ख् उजेड पसरला होता....आढी लावलेल्या अस्सल कोकणी आंब्यांचा घमघमाट सुटला होता....अन......खोलीच्या एका कोप-यात आढ्याला गळफास घेतलेला रोहनचा निष्प्राण देह लटकत होता.....
घडल्या प्रकाराने करंदीकर कुटुंबियांच्या शोकाला पारावार उरला नाही....वाड्यात शोककळा पसरली....पोलीस आले...रोहनचा देह तातडीने ससून रुग्णालयात हलवला....पण काहीच उपयोग नव्हता...त्याच्या कुडीतून प्राण केव्हाच निघून गेले होते.....वाड्यात राहूल तळेकर हा माझा शाळकरी मित्र रहायचा....त्याने फोन केला....'सकाळ'मधून मी लगेच तिथं गेलो...ती खोली पाहिली....रोहनचा फोटो पाहिला...काळजात चर्र् झालं....पण, त्यानं असं का केलं?? हा प्रश्न छळत होता सर्वांनाच.....मग हळूच एका मुलाने सांगितलं...दुपारी रोहन दहावीचा निकाल बघायला एका वर्तमानपत्राच्या आफीसमध्ये गेला होता...एक रुपया देऊन त्याने रिझल्ट पाहिला....परीक्षेत तो नापास झाला होता...आता आई-बाबांना, मित्रांना, वाड्यातल्या रहिवाशांना कसं तोंड दाखवायचं? या भावनेनं तो निराश झाला.... त्याला स्वत:ची कमालीची लाज वाटली असावी.....म्हणूनच इवल्याश्या वयात त्याने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला असावा.........मी रोहनचा परीक्षा क्रमांकही टिपून घेतला....आफीसला गेलो.. रोहनच्या आत्महत्येची बातमी देऊन अस्वस्थ मनानं घरी निघालो....त्यावेळी रोहनचा नंबर माझ्याकडं असल्याचं लक्षात आलं....पुन्हा वर आफीसला गेलो....दिवसभर सर्वांनाच 'वॉन्टेड' असलेलं दहावीच्या निकालाचं पुस्तक आता एका कोप-यात एकाकी पडलं होतं....मी रोहनचा क्रमांक त्यात तपासून पाहिला...पुन:पुन्हा पाहिला....डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता....मग एकदोघांना तो नंबर देऊन त्यांना तपासून पहायला सांगितलं...मी बरोबर होतो.....रोहनला चक्क 76 टक्के मार्क्स पडले होते.....ते तर त्याला दुस-या दिवशी शाळेतही समजले असते...पण वर्तमानपत्राच्या आफीसमधून आगावू रिझल्ट पाहताना तेथील कर्मचा-याची काही गफलत झाली अन कोवळ्या रोहनचा हकनाक जीव गेला....पायाखालची जमीनच सरकल्याचा भास झाला...बुलेटला किक मारण्याचंही त्राण उरलं नव्हतं.....तितक्यात मोबाईल वाजला....राहूलचाच फोन होता...रोहनला 76 टक्के मार्क्स पडल्याचं त्याला सांगितलं...बातमी पुन्हा मागवून घेतली....'अनुत्तिर्ण विद्यार्थ्याची आत्महत्या' हा बातमीचा मथळा बदलला.....तपशील बदलला...' निकाल सांगण्याच्या गफलतीतून विद्यार्थ्याचा हकनाक बळी' असा मथळा देऊन मी बातमी बदलली.....इतक्या वर्षांनंतर आताही कुणाला 76 टक्के मार्क्स पडल्याचं समजलं की रोहनचा चेहरा डोळ्यासमोर येतो....